7. असहकार चळवळ
Online Test ,
Youtube MCQ Video पाठ ,
स्वाध्याय संपूर्ण उत्तरासह पाहणार आहोत.
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून
विधाने पुन्हा लिहा.
(१) गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशातून केली.
(अ)
भारत (ब) इंग्लंड
(क)
दक्षिण आफ्रिका (ड) म्यानमार
(२) शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू
केली.
(अ)
गोरखपूर (ब) खेडा (क) सोलापूर (ड)
अमरावती
(३) जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला
(अ)
लॉर्ड (ब) सर (क) रावबहादूर (ड) रावसाहेब
2 पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :
(१) दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर १९०६ च्या
आदेशान्वये कोणती बंधने घातली गेली?
उत्तर : दक्षिण आफ्रिकेत १९०६ च्या आदेशान्वये
कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करून त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने
घातली गेली.
(२)
गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला ?
उत्तर : गांधीजींनी भारतात १९१७ साली चंपारण्य
येथे पहिला सत्याग्रह केला.
(३) जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा
अधिकारी कोण होता ?
उत्तर : जालियनवाला बागेत जनरल डायर अधिकाऱ्याने गोळीबाराचा आदेश दिला.
3. पुढील प्रश्नांची
प्रत्येकी २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा
(१) सत्याग्रहाचे तत्वज्ञान स्पष्ट करा.
i) 'सत्याग्रह' म्हणजे सत्याचा आणि न्यायाचा आग्रह धरणे होय.
ii) सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसेचा आणि असत्याचा वापर करता
कामा नये.
iii) अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्याची आणि
न्यायाची जाणीव करून दयावी.
iv) अन्यायी व्यक्तीचे मतपरिवर्तन अहिंसक आणि सत्याच्या मार्गाने
करायचे. सत्याग्रहाचे हे नवीन तत्त्वज्ञान गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात रुजवले.
(२) स्वराज्य पक्षाची
स्थापना का करण्यात आली ?
i) असहकाराच्या चळवळीत विधिमंडळाच्या
निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला होता.
ii) चौरीचौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली.
iii) अशा स्थितीत सरकारची अडवणूक करण्यासाठी निवडणुका लढवून कायदेमंडळात प्रवेश
करण्याची कल्पना मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास आदी नेत्यांनी मांडली.
iv) सरकारच्या अन्याय्य धोरणांना विधिमंडळात प्रखर विरोध करण्यासाठी या
नेत्यांनी १९२२ मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) रौलट कायद्याला
भारतीय जनतेने विरोध केला.
i) पहिल्या महायुद्धाचे भारतावरही गंभीर परिणाम झाल्याने जनतेत निर्माण झालेला असंतोष दडपण्यासाठी ब्रिटिश शासनाने रौलट कायदा संमत केला.
ii) या कायदयाने कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचा अधिकार सरकारला
देण्यात आला.
iii) सरकार अटक केलेल्या व्यक्तीवर न्यायालयात खटला न भरता त्याला कितीही काळ
तुरुंगात डांबू शकणार होती.
iv) या कायदयाने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यासही मनाई करण्यात आली
होती.रौलट कायदयातील या जुलमी तरतुदींमुळे या कायदयाला भारतीय जनतेने विरोध केला.
(२) गांधीजींनी असहकार
चळवळ स्थगित केली.
i) भारतभर तीव्र झालेली असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू
केली.
ii)उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौरा येथे निदर्शकांनी फेब्रुवारी
१९२२ मध्ये शांततापूर्ण मिरवणूक काढली.
iii) या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार
केल्यामुळे संतप्त जमावाने पोलीस चौकीला आग लावली.
iv) या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यासह २२
पोलीस ठार झाले. अहिंसात्मक मार्गावर भर देणारे गांधीजी या हिंसेने व्यथित
झाले, त्यांनी १२ फेब्रुवारी १९२२ रोजी असहकार
चळवळ स्थगित केली.
३) भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला.
i) १९१९ साली संमत झालेल्या माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदयाने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या.
ii) त्यामुळे भारतीय जनतेत सरकारविरुद्ध असंतोष होता.
iii) हा असंतोष
दूर करण्यासाठी सरकारने १९२७ साली सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमले.
iv) या कमिशनमध्ये सातही सदस्य इंग्रजच होते. यात एकही भारतीय सदस्याचा समावेश नव्हता म्हणून, भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला.
(४) भारतात खिलाफत
चळवळ सुरू करण्यात आली.
i) जगभरातील मुसलमान
तुर्कस्तानच्या सुलतानास आपला खलिफा म्हणजे
प्रमुख धर्मप्रमुख म्हणून मानत असत.
ii) पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या
विरोधात लढत होते.
iii) या युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर तुर्की खलिफाचे साम्राज्य नष्ट न करण्याचे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले.
iv) युद्धसमाप्तीनंतर मात्र हे आश्वासन इंग्लंडने पाळले नाही. म्हणून तुर्की
खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली.
%20(1).png)
0 Comments