पाठ 2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
itihas lekhan bhartiya parampara
आज आपण इतिहासलेखन : भारतीय परंपरा हा पाठ अत्यंत सोप्या भाषेत व सहज पद्धतीने समजून तर घेणार आहोत त्याच बरोबर या पाठाचा स्वाध्याय , बोर्ड पॅटर्नप्रमाणे घटक चाचणी उत्तरासह व PDF, Online Test पण पाहणार आहोत.
पाठ 2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
सर्व प्रथम हा धडा आपणास समजावा यासाठी या धड्याचे अत्यंत सोप्या भाषेत 5 Youtube Video देत आहोत ते पाहून पाठ समजून घ्या👇👇👇
⇒ भाग 2
पाठ 2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
itihas lekhan bhartiya parampara
१ (अ) दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पूर्ण लिहा
१) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर
कनिंगहॅम हे होत.
(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम (ब) विल्यम
जोन्स
(क) जॉन मार्शल (ड)
फ्रेडरिक मॅक्सम्युलर
२) 'हितोपदेश'या संस्कृत ग्रंथाचा जर्मन
भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला.
(अ) जेम्स मिल (ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(क) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन (ड) जॉन मार्शल
1 ब . पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा
(१) हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास
(२) स्त्री पुरुष तुलना - स्त्रीवादी लेखन
(३) द इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स १८५७ - मार्क्सवादी इतिहास
(४) ग्रॅड डफ - वसाहतवादी इतिहास
उत्तर : चुकीची जोडी : (३) द इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स १८५७ - मार्क्सवादी
इतिहास
प्र. 2 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा :
१) प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
उत्तर : (i) इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रवृत्त केले.
(ii) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला.
(iii) आपल्या प्रादेशिक वैशिष्टयांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले.
(iv) राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच. त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
२) 'बखर' हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
उत्तर : (i) ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक साहित्यात बखरींचाही समावेश होतो.
(ii) बखरीत शूर वीरांचे गुणगान असते.ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात.
(iii) थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात.
(iv) तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून 'बखर'हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
3. पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा :
१) मुघल
सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबीचा समावेश आहे ?
उत्तर : बाबराने आपल्या तुझुक-ई-बाबरी या आत्मचरित्रात
पुढील बाबींची वर्णने केली आहेत
(i) त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने.
(ii) ज्या ज्या प्रदेशांत त्याने प्रवास केला, त्यांची वर्णने आहेत.
(iii) शहरांची वर्णने आहेत.
(iv) स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पतीसृष्टी यांची निरीक्षणे बारकाईने नोंदलेली आहेत
२) राष्ट्रवादी इतिहासलेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते?
उत्तर : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते. त्यांचे राष्ट्रवादी इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे-
(i) १८५७ साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्यसंग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर १८५७ चे स्वातंत्र्यसमर' असे पुस्तक लिहिले
(ii) त्यांच्या या आणि अन्य ग्रंथांमुळे राष्ट्रवादी इतिहासलेखनाला प्रेरणा मिळाली.
(iii) प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
(iv) दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.
४.पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा :
१) मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?
उत्तर : स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात.त्यात मार्क्सवादी इतिहासलेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे.
(i) मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला 'मार्क्सवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
(ii) मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.
(iii) प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे महत्वाचे सूत्र होते.
(iv) मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब दामोदर धर्मानंद कोसंबी, श्रीपाद अमृत डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहासलेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो.
2) इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
उत्तर : इतिहासलेखन,भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण यांत मूलभूत संशोधन करणारे वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे-
i) राजवाडे यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले
ii) इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय, हा विचार मांडला.
iii) केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती म्हणजे इतिहास नव्हेत, असे त्यांचे मत होते.
iv)आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला.
v) अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.
vi) स्थल,काल व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहासलेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहासलेखनाला दिलेले मोठे योगदान आहे.
६.
पुढील संकल्पना स्पष्ट करा :
(1) प्राच्यवादी इतिहासलेखन.
उत्तर : (i) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात
युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा
अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना 'प्राच्यवादी
अभ्यासक' असे म्हणतात.
(ii) या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास,
येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास
करून इतिहासलेखन केले. या लेखनाला 'प्राच्यवादी इतिहासलेखन' असे
म्हणतात.
(iii) या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी
पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच
भारताच्या इतिहासाचे लेखन केले.
2) राष्ट्रवादी इतिहासलेखन.
उत्तर : i) 19 व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास 'राष्ट्रवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
(ii) या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित
इतिहासलेखनाला विरोध केला.
(iii) भारताच्या
इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले.
(iv) राष्ट्रवादी
इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच
प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना
मिळाली.
3) वंचितांचा इतिहास.
उत्तर : (i) समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले; अशा समूहांच्या इतिहासाला 'वंचितांचा इतिहास' असे म्हणतात.
(ii) मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून
वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली.
(iii) इटालियन
तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली.
(iv) वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी
म्ह्णून स्थान मिळ्वून देण्याचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले.
v) परंतु त्यापुर्वीच भारतात वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते
👉 घटक चाचणी उत्तरासह व PDF सह (बोर्ड पॅटर्न प्रमाणे) 👈
https://drive.google.com/file/d/1hCaPoJGYVK06VyUnCe7-Xn5jWt_IXRHR/view?usp=sharing
Muttepawar Sir
0 Comments